Monday, 12 March 2018

'Digi' शाप की वरदान

'Digi' शाप की वरदान
             शाळेत असताना विज्ञान शाप की वरदान या विषयावर निबंध लिहायला लागायचा. प्रत्येकाने यावर लिहले असेल, किंवा प्रत्येकाने याचा विचार नक्कीच केला असेल . पण digi अर्थात digital ते शाप आहे की वरदान याचा आपण प्रत्यक्षात कधी विचारच केला नसेल. Be Digital किंवा digital हो असे शब्द प्रत्येक ठिकाणी ऐकायला मिळतात.
              Digital या शब्दाचा अर्थ न समाजण्यासारखा आहे कारण त्याची व्याप्ती खूप मोठी आहे. Digitalया शब्दाची ताकद इतकी मोठी आहे की राजकीय पक्ष digital बनाएंगे अशी आश्वासने देऊन election जिंकतात सुद्धा. माझ्या मते digital म्हणजे internet च्या माध्यमातून उत्पन्न झालेलं आधुनिक तंत्रज्ञान होय. ज्याच्या साहाय्याने सर्व गोष्टी सोप्या झाल्या आहेत.Digital ने सर्व क्षेत्रात आपला जोम धरला आहे.
              माणूस सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत डिजिटल च्या आहारी गेलेला असतो. वेगवेगळ्या कारणांसाठी तो digital चा वापर करत असतो. जसे की, branded वस्तू वापरणे, प्रवासकरिता vehicle book करणे त्यादरम्यान smart phone वर बातम्या वाचणे, गाणी ऐकणे, सिनेमा पाहणे, chatting करणे, plastic Money म्हणजेच credit card debit card चा वापर करणे, आता त्यापेक्षा आधुनिक म्हणजे online व्यवहार करणे त्यामध्ये खरेदी विक्री किंवा पैसे पाठवणे, सिनेमाची तिकिटे book करणे अशी कितीतरी नगण्य कामे digital मुळे सोपी झाली आहेत. यामुळे माणसाचा अमूल्य वेळ बचावला जातो. म्हणूनच digital ला पसंती दिली जात आहे. Digital चा सर्वात मोठा फायदा म्हणजे घरबसल्या जवळपास सर्वच कामे होतात, त्यामुळे digital हे मानवाला लाभलेलं वरदान आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.
                पण असं म्हणतात ना एखादी गोष्ट जास्त केली की आपल्याला हानी पोहचू शकते, अगदी तसच आहे digital च. Digital मुळे आधुनिक जगात क्रांती घडली आहे, पण हीच क्रांती जगाचा ऱ्हास ही करू शकते.
                Digital मुळे सर्वच गोष्टी सोप्या झाल्या आहेत त्यामुळे माणूस हा दिवसेंदिवस आळशी होत चालला आहे. पूर्वी लहान मुले क्रीडांगण उद्याने यामध्ये खेळताना दिसायची पण आत्ताची मुले video game, play station, laptop, smart phone वर game खेळतात.  त्यामुलांचा दृष्टिकोन बदलला आहे. या मुलांमध्ये आजार वाढत चालले आहेत जसे की कमी दृष्टी आणि लठ्ठपणा.
                Digital मुळे दुरावलेल्या व्यक्ती जवळ आल्या आहेत मात्र जवळच्या व्यक्ती दूर हिताना चे चित्र दिसू लागले आहे. आज प्रत्येकजण आपापल्या कामात इतका गुंतला आहे की त्याला आजूबाजूला काय चालू आहे हे माहीत नाहीये. माणसातला संवाद कमी होत चालल्याचे स्पष्ट दिसून येत आहे, आज एका घरात राहणाऱ्या व्यती कित्येक दिवस बोलत नाहीत याला कुठेतरी digital जबाबदार आहे. पूर्वी प्रवासादरम्यान सर्वांच्या गप्पा रंगायच्या आता हे चित्र पूर्णपणे बदलले आहे प्रत्येकाच्या कानात earphones असतात आणि प्रत्येकजण आपापल्या कामात गुंतला असतो. ही एक प्रकारच्या धोक्याची घंटाच समजावी. त्यामुळे digital हा शाप तर नाही ना हा प्रश्न उपस्थिती होतो...
तुम्हाला काय वाटत याबद्दल प्रतिकिया कळवा...
धन्यवाद..

4 comments: