Tuesday, 30 January 2018

हम किसी से कम नही

        गेल्या वर्षी आपल्या वाचनात किंवा आपल्या कानी मॅच हरली पण मने जिंकली असे शब्द नक्की पडले असतील. हे वाक्य बहुतांश लोकांच्या आवडीच्या विषयाशी म्हणजे आवडीच्या खेळविषयी आहे. तो खेळ म्हणजे क्रिकेट, जुलै महिन्यात पार पडलेल्या icc विश्वकप स्पर्धेत भारतीय संघ पराभूत झाला. हे सर्वांना माहीत आहे. पण यानंतर इंग्लंड येथे icc महिला विश्वचषक स्पर्धा पार पडली. हे खूप कमी लोकांना माहीत आहे.
        या स्पर्धेविषयी कित्येक लोकांना चाहूल सुद्धा नव्हती. महिला खेळाडूंकडून चांगला खेल होईल खेल होईल याची अपेक्षा कोणी केली त्याला देवच जाणे. पण जस जसे सामने पार पडले, तास तसे भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून प्रतिसाद मिळू लागला. भारतीय महिला संघाची उत्तम कामगिरी देश पाहू लागला. पण या आधी कधीही या खेळाडूंना कोण ओळखत असेल असे मोजण्याइतके लोक  असतील.
         स्त्री म्हणजे चूल आणि मूल असहज प्रथा होती. पण कालांतराने स्त्री पुढे येऊ लागली, अगदी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात काम करू लागली. पण समाजात असे काही कपाळ करंठक लोकही आहेत ज्यांना स्त्रियांच्या यशामुळे त्रास होतो अशा सर्व लोकांना प्रतिउत्तर होत ते म्हणजे ही टूर्णामेंट.
         भारतीय महिला संघ फायनलमध्ये काय पोहचला तोच सर्व भारतीयांच्या आशा त्यांच्याकडे आल्या. म्हणजे भारतीय क्रिकेट चाहते कप ची आशा खेळाडूंकडून करू लागले. पण अशीच आशा जर आधीपासूनच आपण खेळाडूंकडून ठेवली असती तर भारतीय महिला संघाचा दबदबा आख्या जगात निर्माण झाला असता. असो पण भारतीय महिला खेळाडूंनी सर्वांची मने मात्र जिंकली असे सर्वांचे मत आहे.
          प्रश्न असा उपस्थित होतो या महिला खेळाडूंचे स्थान आता भारतात नक्की कुठे आहे. त्यांना त्यांच्या हक्कांसाठी म्हणजे सर्व सोयी सुविधा वेळेवर पुरविल्या जातील का?कारण आता त्यांची समाजात ओळख निर्माण झाली आहे. पुरुषांच्या Ipl प्रमाणे महिला ipl खेळविण्यात येईल का? ज्याने करून महिलांना क्रिकेट खेळण्यासाठी महिलांना नवीन व्यासपिठ उपलब्ध होईल, कित्येक नवोदित महिला क्रिकेटर आपली छाप उमटवतील. जर नाही खेळविण्यात आली तर का नाही खेळविण्यात येईल? की महिला खेळाडू अजूनही आपल्याला सिद्ध करण्यात कमी पडत आहेत, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजूनही गुलदस्त्यात आहेत. याची उत्तरे प्रत्येक महिला खेळाडूंना मिळणे आवश्यक आहे.
          कधी का होईना महिला खेळाडूंवर सर्वांचे लक्ष गेले आहे. त्यामुळे त्यांचे जीवन आता सामान्य न राहता खडतर झाले आहे. सरकारने महिला क्रिकेटवर जास्त भर देण्यात यावा कारण यांची पात्रता लोकांना न समजण्यापेक्षा खूप मोठी झाली आहे.

8 comments:

  1. छान. वेगळा आणि चांगला विषय हाताळलास.👌

    ReplyDelete
  2. खुप छान 👌 सुंदर विषय आहे 👌

    ReplyDelete
  3. Muli sathi khup ch abhimanchi gost ahe ani kharch yana aapan scope deun pudhe janyas hatbhar lavyala hava.

    ReplyDelete
  4. कदमो (कलम) का बेहतरीन इस्तेमाल. 👌👌

    ReplyDelete
  5. Pahila lekha khup chhan lihala aahes. Vishay hi changala nivadalas. Khup khup Abhinandhan.

    ReplyDelete
  6. खुपंच वेगळा विषय मांडलास मित्रा..

    ReplyDelete